फांदी वरच्या पिवळ्या पानांना, तोडू नका,

फांदी वरच्या पिवळ्या पानांना, तोडू नका,
एक दिवस ती आपोआप गळून पडतील.

बसत जा घरातील वडीलधारी मंडळीं बरोबर, बोलत राहा,
एक दिवस ती आपोआप शांत होतील.

होवू द्या त्यांना बेहिशेबी, खरचू द्या, मनासारखं वागू द्या,
एक दिवस ती आपोआप तुमच्या साठी, इथेच सर्व सोडून जातील.

नका टोकू त्यांना सारखं सारखं, तेन तेच बोलत राहतात म्हणून,
एक दिवस तुम्ही तरसून जाल, त्यांचा आवाज ऐकायला, जेव्हां ती अबोल होतील.

जमेल तेव्हढा आशिर्वाद घ्या त्यांचा, वाकून, पाया पडून,
एक दिवस ती आपोआप जातील वर तसबीर बनून,
अर्थ नाही मग तुमच्या माफीला, नतमस्तक होऊन, कान धरून.

नका बोलू चार चौघात त्यांना, खाऊ दे थोडे, मनासारखं,
मग बघा येणार पण नाही जेवायला,
भले करा श्राद्ध, सारखं सारखं. 🙏🏻

कवी………… के. यशवंत.

Leave a comment